Saturday, April 5, 2025
spot_img
35.7 C
Delhi
Saturday, April 5, 2025
spot_img
Homeblogकृषी सेवा केंद्रास भीषण आग : लाखो रुपयांचे नुकसान !

कृषी सेवा केंद्रास भीषण आग : लाखो रुपयांचे नुकसान !

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

पाचोरा :- शहरातील नगरपालिकेसमोरिल शॉपिंग सेंटरमधील कृषी सेवा केंद्रास अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तत्काळ पालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाल्याने ही आग विझवण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नसली तरी कृषी केंद्र चालकाचे जवळपास ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्थानक रोडवर रामराव पाटील यांनी गेल्या ६ महिन्यांपूर्वी धरती धन कृषी सेवा केंद्र या नावाने भाडेतत्त्वावर दुकान सुरू केले होते. १८ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळच्या वेळेस ग्राहक नसल्याने रामराव पाटील हे सायंकाळी ५ वाजता कृषी सेवा केंद्र बंद करुन शहरातील गणेश कॉलनी स्थित घरी निघून गेले. दरम्यान, सायंकाळी ७.३० वाजता धरती धन कृषी सेवा केंद्रातून आगीचे लोट उसळु लागल्याने परिसरात खळबळ उडाली. क्षणार्धात या आगीने रौद्ररूप धारण केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या आगीत रामराव पाटील यांच्या दुकानात असलेले खते, बि बियाणे, रासायनिक खते असे जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रसंगी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular